Agriculture Nuksan Bharpai:राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहे. तसेच अतिवृष्टी,गारपीट, पावसाची अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास शासन नुसकन भरपाई देत आहे.

मात्र ,या लाभार्थ्यांसाठी ठराविक अटी व शर्ती पाळाव्या लागेल. नियमाचे पालन करण्याचा शेतकऱ्यांना हा लाभ मिळतो. आता ॲग्रीस्टिक योजनाअंतर्गत एक महत्त्वाचा नियम लागू झाला आहे. ज्यांच्याकडे फार्मर आयडी नसेल ,अशा शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाईस नुकसान भरपाई सह कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही.त्या त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी लवकर लवकरात फार्मर आयडीसाठी नोंद करणे आवश्यक आहे.
नाशिक जिल्ह्यातील स्थिती पाहिली तर येथील दोन लाख 28 हजाराहुन अधिक शेतकऱ्यांकडे अजूनही फार्मर आयडी नाही.यामुळे ते ऑनलाइन अर्ज प्रक्रियेत सहभागी होऊ शकणार नाही.
फार्मर आयडी संबंधित महची पार्श्वभूमी Agriculture Nuksan Bharpai
21 ऑगस्ट 2024 रोजी शासनाने शेतकरी ओळखपत्र क्रमांक धोरणाचा अध्यादेश काढला.14 ऑक्टोबर 2024 पासून ऑनलाईन नोंदणीची सुविधा सुरू करण्यात आली .नाशिक जिल्ह्यात एकूण आठ लाख 84 हजार 736 शेतकरी आहे. त्यापैकी पाच लाख 56 हजार 54 शेतकरी नोंदणी करून फार्मर आयडी प्राप्त केली आहे. त्यामुळे शेतकरी सर्व शासकीय कृषी योजना ,अनुदान, कर्जमाफी व आपत्ती लाभांसाठी पात्र ठरणार आहे. मात्र, उर्वरित दोन लाख 28 हजार 682 शेतकऱ्यांना फार्मर आयडी नसल्याने शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही.
फार्मर आयडी आहे का आवश्यक?Agriculture Nuksan Bharpai
फार्मर आयडी म्हणजे शेतकऱ्यांची डिजिटल ओळख आहे. याद्वारे सरकारी योजना, अनुदान ,पीक विमा, कर्जमाफी यांसाठीची प्रक्रिया सुलभ होते. ॲग्रीस्टिक योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला युनिक आयडी दिला जात आहे.कृषी विभागाच्या सर्व योजनांच्या यापुढे हा आयडी बंधनकारक असून ,एका आयडी सर्व अर्ज प्रक्रिया पूर्ण होतील, त्यामुळे वेगवेगळ्या योजनांसाठी वेगळे कागदपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही. कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी संबंधित शासकीय कार्यालयातून खात्री करून घेणे आवश्यक आहे.